LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

“भारत स्वतंत्र झाला; पण प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे का?” — आकाश हलगेकर

बेळगाव : देशाच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याच्या उत्सवाबरोबरच समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचा सूर बेळगावमध्ये उमटला. “स्वातंत्र्य कुणासाठी?” असा सवाल उपस्थित करत समाजसेवक आकाश हलगेकर, दीपक केतकर, सुनील कोलकार, अमोल चौगुले आणि विनायक चंपन्नवर यांनी गांधी नगर परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसोबत सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी जनजागृती केली.

देशाने राजकीय स्वातंत्र्य मिळवून आठ दशके पूर्ण केली असली, तरी गरिबी, बेरोजगारी, भूक, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक असमानता यांसारख्या प्रश्नांपासून सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण मुक्तता अद्याप झालेली नाही, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

“उपाशी व्यक्तीसाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय?”

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विचार होणे आवश्यक आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबाला, निवाऱ्याच्या शोधात असलेल्या व्यक्तीला किंवा रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाला स्वातंत्र्याची अनुभूती कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि घोषणांपुरते स्वातंत्र्य मर्यादित न राहता त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

“समाजातील शेवटच्या घटकाचे जीवनमान हाच विकासाचा खरा निकष”

देशाचा विकास केवळ रस्ते, इमारती किंवा आर्थिक आकडेवारीवर मोजता येणार नाही. गरीब कुटुंबाला दोन वेळचे अन्न, अनाथ मुलाला शिक्षण, निराधार वृद्धाला आधार आणि बेरोजगार युवकाला रोजगार मिळतो का, यावर विकासाचे खरे मोजमाप झाले पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या वेळी गांधी नगर परिसरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी सामाजिक न्यायाच्या मागण्या मांडणारे फलक हातात घेतले. माध्यमांच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर “भारत स्वतंत्र झाला आहे; मात्र प्रत्येक नागरिक स्वतंत्रपणे, सन्मानाने आणि समाधानाने जगत आहे का?” हा प्रश्न समाजासमोर ठेवण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक मिळेल, तेव्हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ पूर्णत्वास जाईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

— डी मीडिया | DMedia24

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*